माझा जन्म कंधार, जि. नांदेड येथे राबत्या शेतकरी कुटुंबात झाला.
मी माझे उच्च माध्यमिक शिक्षण कंधार येथेच पूर्ण केले.
त्यानंतर नांदेड येथे शिक्षणशास्त्र पदविका पूर्ण करून प्राथमिक शिक्षिकेच्या नोकरीपासून मी माझी कारकीर्द सुरू केली.
बी.ए., बी.एड., एम.ए. या पदव्या मी सेवांतर्गत शिक्षण घेऊन पूर्ण केल्या.
१९८६ ते २००५ अशी २० वर्षं राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे अध्यापन केले.
याच काळात स्वा.रा.ती.म. विद्यापीठातून Ph.D. पदवी संपादन करून २००५ पासून पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे.
१९९२ ते १९९७ या कालखंडात मी गोरठा, (ता. उमरी) मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले.
मी नेहमी ग्रामीण भागातील स्त्रियांच्या, शेतकर्यांच्या आणि शिक्षणाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.
आपल्या निधीतून जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुलांमध्ये वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी पुस्तके पुरविली.
महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रातसुद्धा माझ्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केला.
२००५ नंतर मात्र राजकीय कारकीर्दीला विराम देऊन मी पीपल्स महाविद्यालय नांदेड येथे मराठीची प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक कार्यास आरंभ केला.
कथा, कविता, लेख आणि एकांकिका हा माझा प्रांत.
माझ पहिला कथासंग्रह ’पाण्यातील पायवाट’ हा निर्मल प्रकाशनाने १९९१ मध्ये प्रकाशित केला.
त्यानंतर उपेक्षित, वंचित, स्त्रिया, सामाजिक समस्या या विषयावर मी लेखन केले.
मी माझ्या कथा आणि कादंबरींमधून नेहमी मराठवाडी बोलीभाषेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे.
मी माझे उच्च माध्यमिक शिक्षण कंधार येथेच पूर्ण केले.
त्यानंतर नांदेड येथे शिक्षणशास्त्र पदविका पूर्ण करून प्राथमिक शिक्षिकेच्या नोकरीपासून मी माझी कारकीर्द सुरू केली.
बी.ए., बी.एड., एम.ए. या पदव्या मी सेवांतर्गत शिक्षण घेऊन पूर्ण केल्या.
१९८६ ते २००५ अशी २० वर्षं राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे अध्यापन केले.
याच काळात स्वा.रा.ती.म. विद्यापीठातून Ph.D. पदवी संपादन करून २००५ पासून पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे.
१९९२ ते १९९७ या कालखंडात मी गोरठा, (ता. उमरी) मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले.
मी नेहमी ग्रामीण भागातील स्त्रियांच्या, शेतकर्यांच्या आणि शिक्षणाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.
आपल्या निधीतून जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुलांमध्ये वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी पुस्तके पुरविली.
महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रातसुद्धा माझ्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केला.
२००५ नंतर मात्र राजकीय कारकीर्दीला विराम देऊन मी पीपल्स महाविद्यालय नांदेड येथे मराठीची प्राध्यापिका म्हणून शैक्षणिक कार्यास आरंभ केला.
कथा, कविता, लेख आणि एकांकिका हा माझा प्रांत.
माझ पहिला कथासंग्रह ’पाण्यातील पायवाट’ हा निर्मल प्रकाशनाने १९९१ मध्ये प्रकाशित केला.
त्यानंतर उपेक्षित, वंचित, स्त्रिया, सामाजिक समस्या या विषयावर मी लेखन केले.
मी माझ्या कथा आणि कादंबरींमधून नेहमी मराठवाडी बोलीभाषेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला आहे.